Posts

Showing posts from December, 2022

जात कधीच जात नाही

              - Kunal Mayavati Dattu    जात ही संपूर्ण मानवास लागलेली एक कीड आहे. जी कधीच नष्ट होत नाही. जातीमुळे जातीजातीत माणूस विखुरल्या गेला. माणूस माणसाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. तो खालच्या जातीचा मी वरच्या जातीचा असा भेदभाव करू लागला.                     परंतु हे कुठेतरी थांबायला हवं. मनुष्य कोणत्याही जातीचा का असेना शेवटी तोही आपल्यासारखाच! त्यालाही आपल्या प्रमाणे दोन डोळे कान आणि एक नाक दिलंय जो कोणी या विश्वाचा निर्माता असेल त्याने भेदभाव नाही केला. तर आपण भेदभाव करणारे कोण? कोणी आपल्याला अधिकार दिला भेदभाव करण्याचा......                  आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय. आणि तोही कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता. येथे प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा, फिरण्याचा आणि महत्त्वाचे म्हणजे मुक्तपणे संचार करण्याचा अभिव्यक्त होण्याचा आपल्याला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने बहाल केला आहे.     ...

तनुबाई बिर्जे

              - Kunal Mayavati Dattu Paithane   तानुबाई बिर्जे या भारतातील पहिल्या महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जातात.  1876 मध्ये पुण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील देवराव खोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि शेजारी होते. सोबतच तानुबाई बिर्जे यांच शिक्षण वेताळ पेठेतील महात्मा फुले यांच्याच शाळेत झालं. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या त्या मानसकन्या होत्या. आणि या सर्व बाबींमुळे ताणूबाई यांचे जीवन सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या सहवासात गेल्यामुळे त्यांचा संपर्क सत्यशोधक चळवळीशी आला. आणि या विचारांमुळे त्यांच्याकडे सत्यशोधकीय विचार धारा आली...                     वर्ष होतं 1893 च याच वर्षी 26 जानेवारी रोजी तानुबाई बिर्जे यांचा विवाह वासुदेव बिर्जे यांच्याशी झाला. लागली चार वर्षानंतर म्हणजेच 1897 मध्ये दीनबंधू या वृत्तपत्राची जबाबदारी वासुदेव बिर्जे यांनी स्वीकारली. जवळपास नऊ वर्ष त्यांनी दीनबंधू वृत्तपत्र चालवले. मात्र काही काळानंतर त्यांचा प्लेगच्या आजाराने मृत्यू झ...

सामाजिक न्याय

               -Kunal Mayavati Dattu Paithane   सामान्य मूल्यांवर अधिष्ठित असलेली न्यायाची संकल्पना म्हणजे सामाजिक न्याय होय. सामाजिक न्याय मध्ये प्रत्येक व्यक्ती, समाज ,धर्म ,लिंग ,वंश हे सर्व संविधानापुढे समान समजले जातात..                         आपल्या भारताचे संविधान आपणास स्वातंत्र्य ,समता,बंधुता आणि न्यायाची शिकवण देतो. जी माणसाला माणूस म्हणून प्रत्येकाला माणुसकी बहाल करते. व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो ,स्त्री -पुरुष, श्रीमंत, गरीब या सर्वांना सगळीकडे समान वागणूक मिळेल. कोणावरही अन्याय होणार नाही. अर्थातच वरी म्हटल्याप्रमाणे सामाजिक न्याय हा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रदान करतो.            डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार सामाजिक न्याय ही संकल्पना समता ,स्वातंत्र्य ,बंधुता एकता ,न्याय ,अभिव्यक्ती यावर आधारित आहे.              ∆सामाजिक न्यायाचे प्रमुख उद्दिष्टे∆   ...

तिची कामे

               -Kunal Mayavati Dattu Paithane      स्त्री जिच्या असण्याला या विश्वात खूप महत्त्व आहे .कारण ती प्रत्येक रूपात आपल्याला हवी असते कोणाला आई म्हणून ,कोणाला ताई म्हणून तर कोणाला बायको म्हणून कारण की तिच्या प्रत्येक भूमिका अगदी चोख पणे पार पाडत असते. आणि आपल्या कुटुंबाचा समाजाचा उद्धार करत असते.                     पण आजही तिचे कष्ट मेहनत काम अमान्य केले जाते. सकाळी उठल्यापासून पाणी भरण्यापासून नाश्ता ,जेवण बनवणे ,मुलांना तयार करून शाळेत पाठवणे. घरातील मंडळींना कामाला जाण्यासाठी त्यांची  सर्व कामे ती करत असते. घराची साफसफाई यांसारखीच खूप कामे स्त्री तिच्या दैनंदिन आयुष्यात कायम करत असते .तरीही आपण कामावरून आल्यावर मोठ्या थाटात सांगतो, काय काम करतेस तू ?घरीच तर असते . फक्त टीव्ही बघत . तर इथेच आपण चुकतो. कारण आपण स्त्रीला आतापर्यंत समजूनच घेतलेले नाही. कारण आतापर्यंत आपण फक्त तिच्याकडे वस्तू म्हणून बघत आलोय. आपण कधी तिच्या जागी आपल्याला ठेवून बघितलं का? आपल्याला एक जरी ...

संघर्ष अस्तित्वाचा

             -  Kunal Mayavati Dattu Paithane       अस्तित्व म्हणजे काय? तर अस्तित्व म्हणजे आपलं असणं होईल मग ते शारीरिक असो वा काल्पनिक असण्याला महत्त्व आहे परंतु आजही आपल्या समाजात आपण अनेकांचं असणं नसल्यासारखं गृहीत धरतो                   माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जन मग तो  कुठल्याही जाती धर्मातील असो किंवा गरीब श्रीमंत असो अशा प्रत्येकाला आणि त्याच्या जगण्याला संविधानाने महत्त्वाचे संविधानामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे .कारण सर्वांनाच दोन डोळे , कान, एक नाक या सर्व गोष्टी सर्वांना समान दिल्या आहे.. मग ज्याने दिल्यात त्याने कधी भाव केला नाही तर मग आपल्याला कोणी अधिकार दिला गरीब श्रीमंत ,खालच्या जातीचा, वरच्या  मुळात जात ही मनुष्यनिर्मित आहे. आणि याचा कुठल्याही देवाशी संबंध नाही .अथवा जातीशी ही नाही. माणसाने त्याच्या सोयीप्रमाणे किंवा आवश्यकतेप्रमाणे जाती बनविल्या आहेत.                    आपल्या समाजामध्...

बरखा दत्त

                  बरखा दत्त यांचा जन्म 18 डिसेंबर 1971 मध्ये दिल्ली येथे झाला. त्यांचे वडील पी दत्त हे एअर इंडियाचे अधिकारी होते .तर त्यांच्या  आई प्रभा दत्त या हिंदूस्थान Times च्या प्रसिद्ध पत्रकार होत्या .त्यांची धाकटी बहीण देखील सीएनएन आयबीएन साठी काम करणारी दूरदर्शन पत्रकार आहे .म्हणजेच लहानपणी त्यांना त्यांच्या आईकडून पत्रकारितेचे बाळकडू मिळालं.                          बरखा दत्त यांनी इंग्रजी साहित्यामध्ये सेंट स्टीफन कॉलेज ऑफ दिल्ली येथून पदवी प्राप्त केली .तसेच जामिया मिलिया इस्लामिया मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर दिल्ली येथे मास्तर पूर्ण केले .पण त्या इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नलिस्म , न्यू यॉर्क मधून पत्रकारिता  पद्युत्तर पदवी देखील संपादित केली..                    बरखा दत्त यांनी आपल्या करिअरची सुरुवात एनडीटीव्ही मधून केली .आणि नंतर त्यांनी संस्थेच्या इं...

गौरी लंकेश

                               गौरी लंकेश यांचा जन्म 29 जानेवारी 1962 रोजी बंगलुरु येथे झाला .त्या बंगलोरच्या पत्रकार आणि कार्यकर्त्या होत्या. त्यांचे वडील पी. लंकेश यांनी सुरू केलेले "लंकेश पत्रिका "या साप्ताहिकांमध्ये त्यांनी संपादक पदाची धुरा सांभाळली.                          गौरी लंकेश यांनी आपल्या करिअरची सुरुवात टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रापासून केली. त्यानंतर त्यांनी "संडे मासिक" मध्ये बातमीदार म्हणून काम पाहिले. इनाडू या तेलगू वृत्तवाहिनीसाठी देखील त्यांनी काम केलं .आयुष्याची सोळा वर्षे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात भ्रमंती केली.                       गौरी लंकेश या उजव्या विचारसरणी मधील हिंदुत्वाच्या राजकारणाच्या कट्टर समीक्षक होत्या. हिंदूधर्म हा धर्म नसून समाजातील पदानुक्रमाची व्यवस्था आहे .ज्यामध्ये स्त्रियांना दुतीय श्रेणीतील प्राणी मानले जाते. स्त्रियांना कायमच कमी लेखलं गेलं...

बलात्कार

                           बलात्कार या शब्दांनीच माणसाचा मन हे हेलावून निघते.. तर आपण विचार करू शकतो .की, ज्यांच्यावर हा होतो त्यांचा किती यातना सहन कराव्या लागत असेल ,आयुष्यातलं संपूर्ण सुख या घटनांनी कायमचं हे हिरावल जातं. पण समाजात वावरायला सुद्धा एक प्रकारची बंधने येतात. आणि ही बंधने येऊन देण्याचे कष्ट आरोपी बलात्कारी चांगल्या पद्धतीने घेतात. पहिले तर तिच्या अब्रूचे लचके तोडले जातात .आणि ती कोणाला सांगू नये म्हणून तिला ठार केल्या जाते.                         इतकी भयानक परिस्थिती आपल्या देशात आणि जगात सध्या आहे. ज्यावेळी एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो तिच्या सुदैवाने ती वाचते तेव्हा ती नरक यातनेला सामोरे जात असते .तिची स्थिती अशी असते की ती तिच्या आई-वडिलांना सुद्धा कधी कधी सांगू शकत नाही की ,माझ्यावर बलात्कार झालाय हे घरी जरी कळाले तरी या समाजाच्या भीतीने तेही कोणाला सांगण्याचे धाडस सुद्धा करीत नाहीत. ते सर्व कुटुंब असल्यास स्वतःला संपविण्याचा प्रयत्न कर...

सत्तेसाठीचा सर्वे

               आतापर्यंत आपण अनेक सर्वे बघितले असतील. किंवा आपल्याकडे सर्वे वाले कोणतरी नक्कीच येऊन गेले असणार. परंतु या सर्वेचा आणि विकासाचा काय संबंध? तर सांगतो.                       सर्वे म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीचा अंदाज वर्तविणे होय. आपल्या इकडे निवडणुकांच्या वेळी मोठ्या प्रमाणात सर्वे केले जातात. मग ती ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो ,महानगरपालिका असो वा आमदारकीच्या निवडणुका असो हे सर्वे फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे केले जात आहे.                  आपल्याकडे ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आहेत. त्या निमित्ताने हा सर्वे सगळीकडे सुरू आहे. बहुतांश वेळा सर्वे हा खाजगी एजन्सी मार्फत केल्या जातो. कोणी सर्वे दिल आहे किंवा  किती पैशात दिलाय किंवा सर्वे करणारे कोणामार्फत आले आहेत या सर्व गोष्टी गुप्त ठेवल्या जातात. ज्या  गावचा सर्वे आहे त्या गावात बहुतांश वेळा सर्वे हा त्या गावातील कोणीतरी व्यक्ती एजन्सीला देत असतो. तर कधी आमदारही देतात. पण ...

मानवी विकासात रस्त्यांची भूमिका

                             मानवाचे जीवन समृद्ध करण्यामध्ये रस्त्याची भूमिका फार मोलाची राहिली आहे. कारण  रस्ते विकासामुळेच संपूर्ण देशभरात रस्त्याचे जाळे तयार करता आले आहेत. आणि आवश्यक गरजा जवळपास प्रत्येकांपर्यंत पोहोचवणं किंवा भागवणे शक्य झालं.                           परंतु या रस्त्याचा पाहिजे अजून तसा विकास अजिबात झालेला नाही. कारण रस्त्याचे आयुष्य फारच कमी केले आहे .जसे की पहिले इंग्रजांच्या काळात अनेक फुल इमारती बांधल्या गेल्या अनेक फुल आणि इमारती तर शंभराऊन अधिक वर्ष जुन्या आहेत. आणि त्या ही शाबूत स्वरूपात त्या अजून तरी पडल्याची नोंद नाही. परंतु आताचे रस्ते आणि फुल इमारती अवघ्या काही वर्षांमध्ये नाहीशा होतात. तरी कशा?                           आता बनलेला रस्ता तो फक्त पाच वर्षे कसा टिकतो सहा महिन्यापूर्वी उद्घाटन झालेला पूल तरी कसा तुटतो?         ...

शिक्षण व्यवस्था....!

                    शील, क्षमा, नम्रता म्हणजे शिक्षण होय. जे आजच्या आधुनिक युगात अत्यंत महत्त्वाचं आहे. "शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते .आपण या जगात कशासाठी आलो हे कळते ".ह्याच ओळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लागू पडतात.                  आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था नोकर निर्माण किंवा बनवणारी शिक्षण व्यवस्था आहे .त्याला लहानपणापासूनच सांगितलं जातं तू सरकारी नोकरी कर पोलीस हो, इंजिनीयर हो ,तुला चांगला जॉब मिळाला पाहिजे .म्हणून तू चांगला शिक अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. बारावी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत जवळपास आपण 25 वर्षाचे होईपर्यंत आपल्याला शिकवल्या जाते .आणि मग कुठेतरी पोलीस मध्ये ,बँकेत ,आयटी कंपनीत मोठ्या ऑफिसमध्ये ,सरकारी खात्यात जॉब मिळतो. परंतु जॉब मिळण्याचे प्रमाणही कमी झालं आहे. आता फक्त सुशिक्षित बेरोजगार विद्यापीठातून बाहेर पडतात.                    आयुष्यभर फक्त नोकरीसाठी संघर्ष करतात आणि ते मेहनतीने जर...

आधुनिक तंत्रज्ञान मोबाईल फोन......... पत्र पाठवले जायचे.सुलतानाच्या काळात तर कबुतराच्या माध्यमातून पत्रव्यवहार चालायचा . कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून द्यायची अन् फक्त त्याला सांगायचं कोणाला द्यायच ते बरोबर त्या व्यक्तीपर्यंत आणून पोहोचवत . नंतरच्या काळात पोस्टमार्फत पत्र आपल्यापर्यंत येऊन पोहोचू लागली .परंतु ती खूप वेळ खाऊ पद्धत होती. कारण आपण आज पाठवलेलं पत्र चार आठ दिवसानंतर मिळायचं पण वाट पाहण्यात मजा होती. त्या पत्राची ओढ असायची. परंतु काळ सरत गेला आणि मोबाईलचे युग अवतरलं .त्यामध्ये त्याला हवं त्याला क्षणार्धात पत्र पाठवता येऊ लागलं .कॉलिंग ,मेसेजिंग ,कॅमेरा यांसारख्या मल्टीमीडियाचा त्या मोबाईल मध्ये समावेश होत गेला. आता तर मोबाईल ने प्रचंड प्रचंड मोठी भरारी घेतली आहे .कारण प्रत्येकाकडे मोबाईल फोन आले आहेत .सेकंदाच्या आत आपल्याला हवी ती माहिती गुगलच्या माध्यमातून मिळवता येऊ शकते. ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. पैशाचे व्यवहार देखील आपण फोनच्या माध्यमातून करू शकतो. विधीन सेकंद आपण जगापर्यंत पोहोचत असतो .आणि ताजी अपडेट क्षणाला द मिळवत असतो .अशा पद्धतीने फोन मुळे एक क्रांती झाली आहे. पण माणूसपण मात्र विसरला आहे .माणूस इतका मोबाईलचा आहारी गेलाय की, तो त्यामध्ये कायम गुंतलेला असतो .चार चौघात असताना देखील तो मोबाईल मध्येच असतो .पूर्वी माणसं चार चौघात असले की मस्त गप्पा गोष्टी व्हायच्या पण आता आमचा हा संवाद थांबला आहे...

                        तंत्रज्ञानाने मानवाच्या जगण्याची परिभाषा बदलून टाकली आहे .पहिले पत्र पाठवले जायचे.सुलतानाच्या काळात तर कबुतराच्या माध्यमातून पत्रव्यवहार चालायचा . कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून द्यायची अन् फक्त त्याला सांगायचं कोणाला द्यायच ते बरोबर त्या व्यक्तीपर्यंत आणून पोहोचवत . नंतरच्या काळात पोस्टमार्फत पत्र आपल्यापर्यंत येऊन पोहोचू लागली .परंतु ती खूप वेळ खाऊ पद्धत होती. कारण आपण आज पाठवलेलं पत्र चार आठ दिवसानंतर मिळायचं पण वाट  पाहण्यात मजा होती. त्या पत्राची ओढ असायची. परंतु काळ सरत गेला आणि मोबाईलचे युग अवतरलं .त्यामध्ये त्याला  हवं त्याला क्षणार्धात पत्र पाठवता येऊ लागलं .कॉलिंग ,मेसेजिंग ,कॅमेरा यांसारख्या मल्टीमीडियाचा त्या मोबाईल मध्ये समावेश होत गेला.                            आता तर मोबाईल ने प्रचंड प्रचंड मोठी भरारी घेतली आहे .कारण प्रत्येकाकडे मोबाईल फोन आले आहेत .सेकंदाच्या आत आपल्याला हवी ती माहिती गुगलच्या माध्यमातून म...

माणसाला आणि संशोधनाला जोडणारा दुवा म्हणजे विकास

             माणसाच्या आयुष्यात आतापर्यंत जेवढे काही शोध लागले. त्यामुळे मानवाचा विकास होत गेला . रॉकेटच्या शोधामुळे माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला .विमानाच्या शोधामुळे माणूस अवकाशाला गवसणी घालू शकला .आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळेच बोर्ज खलिफा सारख्या इमारती  उभी राहू शकली.. आणि याच सर्व गोष्टी मागे दळलं यश... आणि हे यश किंवा आपल्याला यशापर्यंत घेऊन जाणारा मार्ग म्हणजे आपला संघर्ष आणि त्यानंतर होतो तो आपला विकास......         आतापर्यंत भारताने अंतराळ असो वा नॅनो टेक्नॉलॉजी या सर्व क्षेत्रांमध्ये मानवाने संशोधन करून आपला ठसा यशस्वीपणे उमटविला आहे .आणि यामध्ये आतापर्यंत स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही योगदान राहिले आहेत.    मानवाचे जीवनमान सुधारन्यात आतापर्यंत संशोधनाची भूमिका सुद्धा महत्त्वपूर्ण राहिली आहे .आणि माणसाला व संशोधनाला जोडणारा दुवा म्हणून विकासाने नेहमीच काम पाहिले आहे......               - Kunal Mayavati Dattu Paithane 

मानवी विकास

                 विकास हा नेहमीच मानवी आयुष्य सुखकर करणारा भाग आहे .सुरुवातीपासूनच विकासाने मानवाचे आयुष्य बदलून टाकले आहे.                   जेव्हा माणूस जंगलात एकटाच राहायचा. हळूहळू तो वस्ती करून राहू लागला, कच्चे मास भाजून खाण्यास त्याने सुरुवात केली, त्याला चाकाची कला उगच झाली. त्याने आधीचा शोध लावला. दगडांपासून हत्यारे सुद्धा बनवली .अशा पद्धतीने विकासाचे शोध लागत गेले .आणि मानवाचे आयुष्य सुखी होत गेले .पण त्याला कळून चुकले होते की ,हे सर्व आपल्या विकासात्मक संशोधनामुळे झालंय.                         नंतरच्या काळात तर त्याने विकासाच्या एक एक पायऱ्या चढण्यास सुरुवात केली .ती कधीही थांबण्यासाठी, एडिसन सारख्या शास्त्रज्ञाने लाईटचा शोध लावला. आणि आपल्या आयुष्यात प्रकाश आणला. राईट बंधू सारख्या भावंडांनी तर आपल्याला उंच उंच उडायला शिकवले .आणि विमान प्रवासाची सोय आपल्यासाठी करून ठेवली. अशा पद्धतीने नवनवीन शोधांनी माणसाचं जगणं अधिकच समृद्ध बनल...

लोकशाही म्हणजे काय

                       लोकशाही म्हणजे प्रौढ मताधिकार्‍यांच्या आधारे खुल्या आणि निःपक्षपाती निवडणूका द्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी द्वारे चालणारे राज्य म्हणजे लोकशाही होय. लोकशाही म्हणजे यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असतो. त्याचबरोबर लोकशाही म्हणजे शासन निवडण्याचा आणि त्याद्वारे कायदे बनविण्याचा अधिकार राजकीय निर्णय घेण्याचा प्रकार होय.                   आपल्या देशात खरंच लोकशाही आहे का ?असा प्रश्न नेहमीच पडतो .अर्थात ती आहेच परंतु आताची देशाची स्थिती बघता लोकशाहीच्या प्रतिमेला हे सरकार हादरे देण्याचं काम करत आहे. 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारताच्या इतिहासात नोंद ठेवण्यासारखी आहे .कारण याच दिवशी आपल्या देशात नोटबंदी झाली होती .रात्री आठ ते दहा च्या सुमारास मोदींनी ही नोटबंदी रातोरात करून टाकली .आणि तीही याची कुठलीही पूर्वसूचना न देता कोणत्याही पक्षांना संसदेला विचारात न घेता आणि महत्त्वाचं म्हणजे जनतेचे न घेता ही नोटबंदी करण्यात आली .             ...

भावना

                     भावना म्हटलं की याचा थेट संबंध हृदयास येतो .मनाला सुख देऊन जातात. तर कधी दुःख .प्रत्येक वेळी ,प्रत्येक ठिकाणी बोलणं महत्त्वाचं नसतं. महत्त्वाच्या असतात त्या भावना समजण्यासाठी माणसाकडे मन असावं लागतं .आणि तेच फॅन्ड्रीच्य समीक्षकाकडे नव्हतं .असं मला वाटतं .कारण सांगितले तर प्रत्येकाने लिहिले की जब्या हा खालच्या जातीचा , शालू ही वरच्या जातीची आणि जब्याला ती आवडत असते.परंतु वातावरण आणि जाती वादाबद्दल या चित्रपटात भरपूर काही भेटेल. शेवटी जेव्हा त्याची बहीण ,वडील ,आई असं सगळं कुटुंब शाळे जवळ डुक्कर पकडण्यासाठी जात असतं तर जब्या ला माहिती असते आता शाळा सुटतात .आणि मी जर डुक्कर पकडायला गेलो तर सर्व शाळेतील मुला मुली मला पाहून हसणार ,मला चिडवणार, आणि याचीच त्याला प्रचंड लाज वाटेते. स्वतःची ,त्याच्या व्यवसायाची आणि इतर गोष्टींची जब्या नेहमी त्याच मन त्याला सांगत असतं तू खालच्या जातीचा आहे. परंतु यामध्ये कोणत्याही समीक्षकांनी जब्याच्या बहिणीकडे जास्त लक्ष दिलेले दिसत नाही कारण ती एक स्त्री आहे म्हणून.....     ...

विकास शेतीचा

                  शेती ही मानवी जीवनातील फार महत्त्वाची गोष्ट आहे .इंद्रजीत भालेराव यांनी लिहून ठेवले ना" माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा "म्हणजे पालन पोषण करणारा किंवा सांभाळणारा कोरोना काळात संपूर्ण जगातील काम धंदे जवळपास ठप्प होते .फक्त आपत्कालीन कामे सोडून मोठमोठे उद्योग देशो-धडीला लागले. अनेक माणसांचे जीव या महामारी मध्ये गेले. दिवस काढण्यासाठी ज्या अन्नधान्याची गरज लागते ते सुद्धा वेळप्रसंगी अनेकांना मिळालं नाही. संपूर्ण जगाचा व्यवसाय ठप्प असताना फक्त एकच व्यवसाय सुरू होता आणि तो म्हणजे शेती.            कोरोना काळात शेतकऱ्याचं आणि शेतीचं महत्व अनेकांना कळालं आणि संपूर्ण जगाला ही कळून चुकलं होतं की , उभ्या जगाला पोसणारा हा फक्त आणि फक्त शेतकरीच आहे.                 भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु आजही तो जगाच्या तुलनेत खूप मागे आहे. इजराइल सारख्या छोटासा देश शेतीमध्ये नंबर एकला आहे तर तो का पुढे आहे तर तिथे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते .आ...

तिचं असणं

             प्रत्येकाच्या आयुष्यात ती असते कधी ताई म्हणून, कधी आई म्हणून, तर कधी बायको म्हणून ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते. आणि तिचं  हेच असणं आपलं जीवन समृद्ध करत असतं....               तिचे स्थान समाजात नेहमीच दुय्यम राहिले आहे. किंवा पुरुषांपेक्षा नेहमीच कमीअसते. कारण ती स्त्री आहे म्हणून ती उठल्या पासून किंवा जन्मल्यापासून सर्व कामे करायला लागते. ती छोटी असताना आईला भांडे घासू लागते. तर कधी वडिलांना पाणी आणून देते. अशी कामे ती छोटी असताना आपल्या हाताने आणि मनाने करत असते. थोडी मोठी झाली की, ती आईला घर कामात मदत करत असते. पाणी आणू लागते, तर कधी वडीलधाऱ्यामंडळींना जेवण वाढण्यास मदत करत असते. जशी -जशी ती मोठी होत जाते, तसा तिच्या कामाचा व्याप वाढत जातो. त्याच्यावर बंधने येतात लहानपणी मुक्त बागडणारी ,खेळणारी आता मोठी झाली असल्याने खेळू शकत नाही, एकटी कुठे जाऊ शकत नाही, बाहेर पडू शकत नाही, आणि जरी बाहेर जाणार असली तरी तिच्यासोबत तिचा छोटा भाऊ पाठवतात. तर का? तर तो तिचे रक्षण करतो म्हणून किंवा ती त्याला राखी बां...

चित्रपटातील तिची भूमिका

             चित्रपट हा आपल्याच आवडीचा विषय...! जो आपल्याला काही क्षणासाठी का होईना त्या चित्रपटांमध्ये घुसण्यास भाग पाडतो. तो चित्रपटांमधील अभिनेत्याच्या आणि अभिनेत्रींच्या भूमिकांनी..            कधी माणसाला खळखळून हसवणाऱ्या तर कधी रडवनाऱ्या इतक्या प्रभावी भूमिका चित्रपटांमधील संपूर्ण टीम पार पाडत असते. आणि चित्रपटाचे वेड लागते ते काही औरच....             प्रत्येक चित्रपटाची आतापर्यंत एकच शोकांतिका बघायला मिळाली. ती म्हणजे त्यात स्त्रीला कायम दुय्यम, दुर्बल, आणि कमजोर समजलं गेलयं. कोणताही चित्रपट असो जेव्हा अभिनेत्री संकटात असते तेव्हा तिला वाचवायला नेहमी हिरोच  का येतो? त्या स्वतःच रक्षण का करू शकत नाही?          आतापर्यंत असा सिनेमा का तयार झाला नाही. ज्यामध्ये स्त्री ही त्या चित्रपटाची हिरो आहे. तीच प्रत्येक वेळेला हिरोईनच का? ती स्वतःची लढाई स्वतः का लढू शकत नाही. हा प्रश्न जोपर्यंत आपणास पडणार नाही. तोपर्यंत स्त्रीच्या जगण्याचा स्थर उंचवणार नाही... ...

समृद्धी महामार्गाच्या पलीकडे

          मुंबई ते नागपूर या शहरांना जोडणारा महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग होय. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबी असणारा आहे. पहिले मुंबईवरून नागपूरला जाण्यासाठी 14 ते 15 तास लागायचे परंतु समृद्धी महामार्गामुळे हे अवघ्या सात ते आठ तासांवर येऊन ठेपलं आहे.          समृद्धी महामार्ग बनविताना आलेल्या बहुसंख्य अडचणीवर मात करत रस्ता तयार करण्यात आला आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, शेती गेली आहे, गावच्या- गाव स्थलांतरित करावी लागली आहेत, अनेकांचे हॉटेल ,रेस्टॉरंट आणि जवळपास महत्त्वाचे ठिकाणे  या महामार्गामध्ये गेली आहेत. परंतु या सगळ्या बाबींच्या बदल्यात त्यांना त्याचा मोबदला अर्थातच पैसे मिळाले आहेत. काही ठिकाणी तर पाच पट पैसे देऊन  जमीन मिळविली आहे. त्यामुळे शेतकऱ्याना ही काही वाटलं नाही. अनेकांची तर इच्छा होती माझ्या शेतातून समृद्धी महामार्ग जायला हवा. कारण त्यांना माहिती होतं. आपल्या सात पिढ्यांनी जरी शेती केली ना तरी एवढे पैसे मिळणार नाहीत. आणि ज्यांनी या प्रकल्पाला  विरोध केला त्यांची तोंड बंद करण्यात आली...